Narayan Peth, Pune 30
24 Hours Available
( फोन वाजतो ) हॅलो आधार सर्व्हिसेस ?
मी : हो , कोण बोलतय ? ( साधारण वयस्कर आज्जी चा आवाज )
आज्जी : मी फाटक बोलत आहे , बावधन ला राहते ,मला तुमच्या आधार सर्व्हिसेस बद्दल कळलं ,मी तुमच्या सगळ्या सर्व्हिसेस वाचल्या पण ह्यातली कोणतीच सर्व्हिस मला नको आहे.
मी : ओके, मग काय मदत करु तुमची ? तुम्हाला कोणती मदत पाहिझे आहे का ?
आज्जी : माझ्याशी रोज एक तास फोनवर बोलणार का ?
मी : ( मला काही कळलं च नाही ) पण मी पटकन "हो " मम्हणून मोकळी झाले ( पुढे काही बोलणार तेवढ्यात आजी म्हणाल्या )
चल उद्या बोलू , मी उद्या फोन करते ,काळजी घे. ( फोन कट )
खरं तर मला ह्यावर काही बोलायच ते कळतंच नव्हतं , कारण असा फोन पहिल्यांदा आला होता ,आधार मध्ये काम करत असताना आज्जी आजोबांना भेटणं बोलणं होतच पण असा फोन पहिल्यांदा आला होता मी फार विचार न करता कामाला लागले पण उद्याच्या फोन ची मात्र वाट पाहत होते हे नक्की.
( फोन वाजतो ) साधारण 4:30 वाजले असतील.
हॅलो हा मी फाटक बोलत आहे , कामात आहेस का ? नंतर करू का कॉल.
मी : ( गाडीवर होते ,पटकन गाडी बाजूला घेतली ) अहो नाही नाही बोला ना , मी खरं तर तुमच्या फोन ची वाट पाहत होते.
आज्जी : अगं त्याचं झालं असं मी घरी एकटीच राहते मुलगा परदेशात असतो आणि मुलगी सुद्धा , त्यात सध्या वयानुसार खूप दुखणी मागे लागली आहेत आणि त्यात हे कोरोनाचं आहेच त्यामुळे बाहेर पडत येतं नाही आणि घरी कोणाला बोलावता येत नाही म्हणून तुला म्हणलं की फोन वर बोलायचं का ? मला फक्त बोलायच आहे गप्पा मारायच्या आहेत , रोज एक अर्धा एक तास चालेल का गप्पा मारल्या तर
मी : अहो अगदीच तुम्ही तुमच्या वेळेनुसार कॉल करत जा, आणि कधी काही वाटलं किती वाजता पण फोन करा काही प्रॉब्लेम नाही , ( आमचा बोलणं चालू झाला मग साधारणपणे 1 तास बोललो आम्ही )
असा रोजच चालू झालं , ५,६ दिवस आम्ही रोज बोलत होतो , त्यांची वेळ ठरलेली होती , ४:३० च्या सुमारास त्या फोन करायच्या , जेवढ्या वेळ त्या गप्पा मारायच्या त्यात कधी त्यांनि कोणाची complaint किंवा कोणावरच राग , घरातल्या कटकटी अश्या प्रकारचं काहीच बोलल्या नाहीत , कधी कधी अस होईच की त्या काय बोलत आहेत तेच मला कळायचं नाही , त्यानि मला सांगून ठेवलं होतं की आता माझा वय झाला आहे ,त्यामुळे मी वायफळ खूप बडबड करते,एकच वाक्य 4 वेळ repeat करते तर , तुला कंटाळा आला तर फोन side ला ठेऊन दे हा पण कट नको करू.
" कारण आपलं कोणी तरी ऐकून घेत आहे ह्यातच खूप मोठं समाधान असत , आणि ह्या वयात तर अगदीच " पण मला मनापासून त्यांचं ऐकावं वाटायचं , त्या बोलण्यात त्या मला त्यांचे अनुभव share करायच्या ,कधी जोरात हसायच्या , कधी आवाज रडवेला होईचा, पण कधीच कोणा बद्दल वाईट बोलल्या नाहीत , जे मला प्रचंड आवडायचं ,चार गोष्टी समजून सांगायच्या , त्यामुळे मला पण त्यांच्या फोन ची सवय झाली होते , एक दिवस त्यांचा 5 वाजून गेले तरी फोन नाही आला तर मलाच घाबरल्या सारख झालं म्हणून मीच फोन केला तर मला म्हणल्या कश्या " आग मी आहे मी अजून , घाबरायला काय झालं ,एवढ्या लवकर नाही सोडणार मी तुला " ( आम्ही दोघी पण हसलो ) दुपारीची झोप आज जास्त वेळ झाली त्यामुळे फोन करायला उशीर झाला , बरं सांग कसा गेला आजच दिवस... त्या दिवशी अर्धा तासच बोलणं झालं )
"आधार " चालू केल्यापासून मला ह्या म्हातारपणात होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक बदलाचे खूप अनुभव यायला लागलेत , वृद्धत्व म्हणजे खरच बालपण असत हे मात्र खरं आहे , एक दोन दिवस गेले आम्ही गप्पा मारत होतो साधरन 8 दिवस हे सगळं नीट चालू होतं , पण एक दिवस आजी च फोन आला नाही मी वाट पाहिली ,मी स्वतःहून त्यांना फोन न करण्यामागे कारण होती एक म्हणजे मला त्यांचा time schedule माहीत नव्हतं , मी फोन करायचे आणि त्या झोपल्या असतील आणि माझ्या फोन मुळे झोप मोड झाली तर , अश्या भीतीने मी फोन शक्यतो करायचे नाही ,पण त्या दिवशी ६ वाजले तरी फोन नाही , मग न राहवून मीच केला फोन उचलला नाही , दोन तीन वेळा try केला तरी उचलला नाही ,मग मात्र मला काही कळेना , परत ९ वाजता फोन केला तरी नाही , मग मात्र घाबरले आणि १०:३० वाजता मला फोन आला ,आणि मी काही ऐकून न घेता चालू झाले " अहो काय आजी फोन का नाही उचलला , मी किती घाबरले , काय झालं काय होत आहे , "
समोरून एक मुलाचं आवाज आला ,मी फाटक काकू चा पुतण्या बोलतोय , " काकू काल रात्री गेली "
मी .................
मी : ओहहह सॉरी पण थोड्या वेळाने call करू का ?
पुढे साधारण मला काही वेळ काहीच सुचत नव्हतं.
मी थोड्या वेळाने कॉल केला ,त्यांच्या relative शी बोलले , पण रात्र भर झोप काही लागेना , त्याच बोलणं ,त्यांनी सांगितलेल्या गोष्टी सगळं आठवत होत , त्यांनी मला संगतिलेलं एक गोष्ट खूप प्रकर्षाने आठवते ती म्हणजे ' बाई ने काही झालं तरी तिचा स्वाभिमान आणि respect कधी कमी होऊ द्यायचा नाही , अश्या बऱ्याच गोष्टी त्यांनी मला सांगितल्या , पण त्या ८ दिवसात मला त्यांनी खूप काही शिकवलं , समजावलं ,खूप अनुभव share केले , त्या म्हणायच्या तुम्ही आजकालच्या पोरीच खूप नशीब घेऊन जन्माला आल्या आहेत , आमच्या वेळी अशी बाहेर पडायची सुद्धा आम्हाला परवानगी नव्हती , काम करणं तर तर लांबच राहील , असो सांगण्या सारख खूप आहे , तर अश्या आमच्या ह्या फाटक आज्जी , आता कधीच फोन येणार नाही , त्यांना भेटता नाही येणार , पण हे मी काधिच विसरू शकणार नाही , त्यांनी सांगितलेल त्यांचे अनुभव मला माझ्या वैयक्तीक आयुष्यत नक्कीच प्रेरणा देतील .
ज्येष्ठांसाठी आम्ही 'आधार सर्व्हिसेस' सुरू केले त्याला आज बरोबर सहा महिने पूर्ण झाले. या काळात आम्ही समृद्ध झालो कारण अनेकानेक अनुभवांची समृद्धी आमच्याकडे आली. त्यातील काही निवडक, हृदयस्पर्शी अनुभव तुमच्याशी शेअर करावेत असं मनापासून वाटलं. म्हणून आजपासून त्याची सुरुवात करीत आहोत. वाचून आपण आपला प्रतिसाद जरूर कळवा आणि आमच्या पंखातील बळ आणखी वाढवा...
मानसी कुलकर्णी: 9834746942
Copyright© All right reserved Aadhar Services. Oyster Technology.