Narayan Peth, Pune 30
24 Hours Available
जिद्द जगण्याची!.
आपल्याला आयुष्यात वेळोवेळी वेगळी वेगळी माणस भेटत असतात आणि ते प्रत्येक जण एक नवीन अनुभव देत असतात. कधी कधी मिळणारे अनुभव इतके महत्वाचे असतात की पुढच्या आयुष्यात अनेकदा ते आपल्याला उपयोगी ठरतात, असाच एक अनुभव आम्हाला आला मागच्या दिवाळीत. तो आवर्जून शेअर करीत आहे.
"काका, आपल्याला आता ऑपरेशन नेणार आहेत डॉक्टरांनी सांगितलं आहे ओपॅरेशनमध्ये काहीही होऊ शकतं. तुम्ही नक्की तयार आहात ना ? आपल्याला पाय कापावा लागणार आहे." मी कसंबसं आजोबांचं मन तयार करीत होते.
त्यावर मला ते म्हणाले, "पोरी, मी 100% तयार आहे. मी बरा होऊन घरी जाणार. तू निश्चिन्तपणे बाहेर बस." असं म्हणत त्यांनीच मला आश्वस्त केलं.
त्यांना ओपॅरेशनला नेलं , काका आत्मविश्वासाने शस्त्रक्रियेला सामोरे गेले होते. त्यांच्या चेहऱ्यावर कसलीही भीती किंवा कसलाही टेन्शन नव्हतं. हा, पण जगण्याची उमेद मात्र होती. पण मला उगीच धाकधूक होती. मी आणि अमन उगीच आत बाहेर करत होतो.
"कुलकर्णी कोण आहेत त्यांना डॉक्टरांनी बोलावलं आहे" असा आवाज आला आणि आम्हाला दोघांना पण टेन्शन आलं. मी पटकन आत गेले. एकालाच कोणाला तारी आत सोडत होते. डॉक्टर आणि टीम आत होती. मला हसतमुखाने डॉक्टर म्हणाले, "काकांची जगण्याची इच्छा शक्ती जोरात आहे ऑपरेशन success झाले आहे."
बस्स! त्या क्षणी आम्ही शांत झालो...
संध्याकाळी भूल उतरली आम्ही काकाना जाऊन भेटलो. त्यांनी माझ्या हाताने पाणी प्यायलं. आम्ही डॉक्टरांशी बोलून निघालो.
तसं आमची ओळख फक्त 4 दिवसांची! काका एकटे होते. ना बायको ना मूल बाळ. पुढे ते बरे झाले. त्यांच्या घरी गेले. पंढरपूरला. नंतर छान बरे झाले.
त्यांची तब्येत नाजूक होती. हृदय 20 % चालत होतं. पायाला गँगरीन झालं होतं. त्यातून हाय डायबेटीस, हाय बीपी, एक किडनी फेल झालेली. एवढ सगळं असतानासुद्धा तेवढीच जगण्याची उमेद होती ,lआणि मुळात आपलं म्हणावसं असं कोण नाही. आता पाय कापल्यामुळे तर परस्वाधीन झालेले पण तरी जगायच्या बाबतीत ते एवढे possitive होते ते की त्या चार दिवसात त्यांनी आम्हाला जगावं कसं हेच चार दिवसांत शिकवलं.
जेंव्हा जेंव्हा मी डिस्टर्ब होते तेव्हा मी या काकांची जगण्याची उमेद आणि जिद्द आठवते.
10 दिवसांत आमची छान गट्टी जमली होती. सरत्या वर्षांने काय दिल हे जेंव्हा मी आठवत होते तेंव्हा त्या काकांचा चेहरा समोर आला. आणि मग बाकी काही आठवण्यासारखं राहिलंच नाही. कितीही प्रतिकूलता आली तरी जगण्याची आस सोडायची नाही एवढा possitve approach प्रत्येकाने आपल्या आयुष्यात ठेवला तर आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्की बदलेल.
मानसी कुलकर्णी : 9834746942
Copyright© All right reserved Aadhar Services. Oyster Technology.